मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज विधानभवनात पार पडला. हा ठराव महाविकास आघाडीच्या सरकारने १६९ मतांनी जिंकलेला आहे. परंतु हा विश्वासदर्शक ठराव सुरु असताना भाजपने सभात्याग केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत मांडण्यात आला. विधानसभेची विशेष अधिवेशन यासाठी बोलविण्यात आलं होतं. मात्र संविधानाची पायमल्ली करुन सभागृहाचं कामकाज सुरु आहे, विधानसभा अधिवेशन नियमाला धरुन बोलाविले नाही, राज्यपालांनी कोणतंही समन्स काढलं नाही, त्यामुळे हे अधिवेशन असैविधानिक आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
BJP leader Devendra Fadnavis on Opposition MLAs walkout of state Assembly ahead of floor test: This session is unconstitutional & illegal. Appointment of Pro-tem Speaker was also unconstitutional #Maharashtra pic.twitter.com/KRkqECBGIf
— ANI (@ANI) November 30, 2019
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंत्र्यांनी घेतलेली शपथ अवैध आहे. शपथ घेताना एक मसूदा असतो. राज्यपालांनी मी म्हटल्यानंतर मंत्र्यांनी अनेक नेत्यांची नावे घेतली. पहिल्यांदाच हंगामी अध्यक्ष बदलण्याचा नियमबाह्य काम केले. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इतिहासात आजपर्यंत विधानसभा अध्यक्षाची निवड होत नाही तोपर्यंत विश्वासदर्शक ठराव मांडता येत नाही असं त्यांनी सांगितले.