आई वडिलांचं आणि छत्रपतींच नाव घेणं गुन्हा असेल तर, मी पुन्हा करेल
मुंबई – महाविकासआघाडीची बहुमत चाचणी पार पडली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठराव 169 मतांनी जिंकला आहे. महाविकासआघाडी सरकारचं बहुमत सिद्ध झालं आहे.
दरम्यान, यावेळी विरोधकांनी उद्धव ठाकरे आणि अन्य सहा आमदारांनी घेतलेल्या मंत्रिपदाच्या शपथेसंदर्भात आक्षेप घेतला होता. मात्र उद्धव ठाकरेंनी आपल्या पहिल्या भाषणातच विरोधकांना फटकारले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, ” शपथ घेताना जर आपल्या आई वडिलांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं हा जर गुन्हा असेल तर मी तो पुन्हा करायला तयार आहे. जो व्यक्ती आपलं दैवत आणि आईवडिलांना मानत नाही त्याला जगायचा अधिकार नाही.” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.