नवी दिल्ली – श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबो येथे आज सकाळी साखळी बॉम्बस्फोटांच्या मालिकेमध्ये 25हून अधिक लोक मृत्युमुखी पडले असून 200हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. ईस्टर संडेच्या निमित्ताने आपल्या घरांमधून बाहेर पडलेल्या लोकांवर या साखळी बॉम्बस्फोटांच्या मालिकेद्वारे निशाणा साधण्यात आला आहे. 6 बॉम्बस्फोटांच्या मालिकेमधील 3 बॉम्बस्फोट हे चर्चमध्ये तर 3 बॉम्बस्फोट वर्दळीच्या हॉटेल्समध्ये घडवून आणण्यात आले आहेत.
दरम्यान, याबाबत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून त्या म्हणाल्या, “या साखळी बॉम्बस्फोट मालिकेनंतर मी कोलंबोतील भारतीय उच्च-आयुक्तांच्या सातत्याने संपर्कात असून भारत श्रीलंकेतील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवत आहे.”
EAM Sushma Swaraj on multiple blasts in Srilanka: I am in constant touch with Indian High Commissioner in Colombo. We are keeping a close watch on the situation. (file pic) pic.twitter.com/vFZm1u8nky
— ANI (@ANI) April 21, 2019