वालचंदनगर -येथील श्री वर्धमान विद्यालयात 2019 पासून शासकिय चित्रकला परीक्षा केंद्र सुरू करण्यात आले आहे. पहिल्याच वर्षी केंद्रात वालचंदनगर,निमसाखर, कळंब, कुरवली येथील 190 विद्यार्थी एलिमेंटरी ग्रेड व 28 विद्यार्थी इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी बसले होते. भूगोल प्रज्ञा शोध परीक्षेत 12 वीमधील विद्या दीपक तरंगे हिने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
यावर्षी केंद्राचा एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचा अनुक्रमे 98.37 व 97.77 टक्के निकाल लागला आहे. विद्यालयाचा एलिमेंटरी परीक्षेचा 95.88 व इंटरमिजिएट परीक्षेचा 100 टक्के निकाल लागला आहे. भूगोल प्रज्ञा शोध परीक्षेत 12 वीमधील विद्या दीपक तरंगे हिने 100 पैकी 100 गुण प्राप्त करुन राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.
आठवीतील अस्मिता चंद्रकांत पानसरे 96 गुण प्राप्त करून विद्यालयात द्वितीय तर नववीतील विरेंद्र शशिकांत पांडुळे याने 92 गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला. शासकिय चित्रकला परीक्षा केंद्राकरिता कला शिक्षक अतुल गायकवाड, प्रमोद गायकवाड व सारिका माने यांनी विशेष परिश्रम घेतले.
भूगोल प्रज्ञा शोध परीक्षेसाठी भारत पाटील, माणिक पिसे व दीपक रासकर यांनी विशेष सहकार्य केले. दोन्ही परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे शाळा समिती अध्यक्ष अमोल गेंगजे व प्राचार्य नवनाथ जाधव यांनी अभिनंदन केले आहे.