पौड, (वार्ताहर) – मुळशी तालुक्यातील निसर्ग संपन्न कोळवण खोऱ्यात गिरीवन प्रोजेक्ट व्यवस्थापन मार्फत वन विभाग पौड, मुळशी व मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने होतले -डोंगरगाव येथील गिरीवन प्रकल्पात वणवा विझवणे,प्रात्यक्षिक व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी वणवा विझवण्याचे प्रात्यक्षिक वन विभागाचे कर्मचारी तसेच मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती संस्थांचे कर्मचारी यांनी दाखविले. या कार्यक्रमासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी मुळशी संतोष चव्हाण. वनविभाग लेखापाल लक्ष्मण शिंदे, धनश्री पालकर, रूपाली पाटील,प्रमोद बलकवडे,किशोर देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून होते.
तर या कार्यक्रमास वनपाल नंदकुमार शेलार, कल्याणी मच्छा, बनसोडे वनरक्षक संतोष मुंडे व सहकारी, प्लॉटधारक दीपक घायाळ, विजय कोपरकर, वसंत रत्नपारखी, कॉन्ट्रॅक्टर जयराम दुर्गे, राजू भाई मुलाणी, स्वप्निल जोरी, पंडू दुर्गे, धोंडीबा जोरी, ढेपे वाड्याचे धैर्यशील कदम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन गिरीवनचे तजमूल पटेल,पांडुरंग कारले, अमोल अभ्यंकर, वैजनाथ शिरसाठ, सुरक्षा अधिकारी संजय मोरे, संदीप बडे, मारुती पाटील यांनी केले. या कार्यक्रमात प्रकल्पातील प्लॉटधारक, कॉन्ट्रॅक्टर, कर्मचारी, केअरटेकर, ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निसर्गाला लागलेला शाप म्हणजे वनाला लागणारे “वणवे”. वने ही सर्वांची जबाबदारी आहे. संरक्षित किंवा राखीव वनात आग लावल्यास किंवा वनास धोका पोहोचल्यास त्या आरोपीविरुद्ध भारतीय वनाधिनियम १९२७ च्या कलमानुसार गुन्हा नोंदवून एक वर्षाचा कारावास व रक्कम ५००० इतक्या दंडाची शिक्षेची तरतूद आहे. -संतोष चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी.