मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला. पण त्याच्या निधानानंतर सोशल मीडियावर घराणेशाही हा वाद पेटून उठला आहे. सध्या घराणेशाहीवरून सर्व स्तरातून विरोध केला जात आहे मात्र आता चित्रपट निर्माते आर. बाल्की यांनी घराणेशाही या वादावर त्यांचे मत मांडत संताप व्यक्त केला आहे.
चित्रपट निर्माते आर. बाल्की म्हणाले की,’‘हे नाकारता येण्यासारखे नाही. हे सर्वत्र आहे. एकदा विचार करा अंबानी, बजाज, महिंद्रा यांच्या वडिलांनी त्यांचा बिझनेच त्यांच्या मुलांकडे सोपवला. मुकेश अंबानी हा बिझनेस सांभाळू शकत नाहीत, दुसरं कुणी तरी सांभाळायला हवा असा कोणी विचार केला का? समाजातील प्रत्येक स्थरामध्ये हे होत असते. या विषयावर चर्चा करणे म्हणजे मूर्खपणाच आहे’ असे त्यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले,’आलिया भट्टच्या अभिनयाचे कौतुक करण्याऐवजी लोकं तिला एका चित्रपट निर्मात्यांची मुलगी आहे. म्हणून ट्रोल करत आहेत. आलिया आणि रणबीर कपूर यांच्या पेक्षा चांगले कलाकार मला शोधून दाखवला आणि मग आपण यावर बोलू. असे बाल्की यांनी म्हटले आहे.