वाघोली ( प्रतिनिधी) : वाडेबोल्हाई, गावडेवाडी, बिवरी, प्रयागधाम, कोरेगावमुळ, वळती या बाधित शेतकर्यानी या भूसंपादनास प्रखर विरोध केला आहे. शेतकऱ्यांना चार पट आणि पाच पट मोबदला मिळणार, अशी खोटी माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे. तशी आजपर्यंत कुठलीही अधिसूचना अथवा आदेश नसतानाही लोकांची दिशाभूल करून भूसंपादन करण्याचे बेकायदेशीर प्रयत्न सरकारकडून चालले आहेत.
ह्या संपूर्ण रिंगरोडची आखणी शास्त्रीय दृष्ट्या व आर्थिक दृष्ट्या बरोबर नसल्याचे सांगितले. या पुर्व भागाला यापूर्वीचे दोन रिंगरोड मंजूर आहेत ते जाणीवपूर्वक विकसित केले जात नाहीत. या आखणीमध्ये गोलमाल असल्याची चर्चा सर्व शेतकऱ्यांमध्ये चालू होती. या सरकारच्या चूकीच्या धोरणाला आणि हुकूमशाहीला विरोध कायम ठेवण्याचा निर्णय या बैठकीत एकमताने झाला.
हा रिंगरोड रद्द करावा अशी मागणी सर्व शेतकऱ्यांनी केली. याबाबत लवकरच दुरुस्त याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. याबाबत कोरेगावमुळ, प्रयागधाम, बिवरी, गावडेवाडी, वाडेबोल्हाई, शेतकर्यांची बिवरी (गोते) व कोरेगावमुळ येथे बैठक झाली. ही बैठक सोशल डिस्टन्स पाळून पार पाडली.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
माणिकराव गोते (राष्ट्रवादी काँग्रेस नेते, शिरूर-हवेली मतदारसंघ)
आहेत ते रस्ते प्रथम विकसित करा शेतकऱ्यांच्या भावनेचा अंत पाहू नका. यावेळी अशोक सावंत, बाळासाहेब चोरघे, प्रभाकर कामठे, काळुराम गोते, महेंद्र झेंडे, विठ्ठल कोलते, योगेश गायकवाड ,अमित चौधरी, अमोल भोसले, दादा कोलते पंचकृषीतील शेतकरी बाधित उपस्थित होते.