success story – छत्तीसगडच्या एका शेतकऱ्याची चर्चा सध्या देशभरात होत आहे. येथील शेतकऱ्यांनी शेती करून करोडो रुपये कमावले त्याच सोबत 7 कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी केला आहे.
छत्तीसगडच्या या शेतकऱ्याचे नाव राजाराम त्रिपाठी आहे. राजाराम बस्तरच्या कोंडागाव आणि जगदलपूर जिल्ह्यात स्ट्रोव्हिया, काळी मिरी आणि पांढरी मुसळीची लागवड करतात. शेतकरी राजाराम त्रिपाठी हे काळी मिरी आणि पांढरी मुसळीचे सर्वाधिक उत्पादन करतात . राजाराम यांना तीनदा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार मिळाला आहे. अनेक शेतकऱ्यांसाठी राजाराम त्रिपाठी हे प्रेरणास्त्रोत आहेत. राजाराम त्रिपाठी यांनी बस्तरच्या आदिवासींना सेंद्रिय शेतीशी जोडून स्वत:सह आर्थिकदृष्ट्या समृद्ध केले आहे.
राजाराम त्रिपाठी हे काळी मिरी हे जेवणातील मसाल्यात वापरले जाते तर पांढरी मुसळी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणून शतकानुशतके आपल्या देशात या वनस्पतीचा वापर केला जातो. एक अतिशय सशक्त आणि अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणून या पांढऱ्या मुसळीचा वापर केला जातो. शरीराच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे ही फायदेशीर मानली जाते.
या उत्पादनातून त्यांना कोटींच्या घरात नफा झाला आहे. राजाराम सेंद्रिय शेती करतात. रिपोर्टनुसार राजाराम त्रिपाठी यांनी त्यांच्या शेतीच्या कमाईतून ७ कोटी रुपयांना हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हॉलंडच्या रॉबिन्सन कंपनीशी त्यांनी करार केला आहे.
ज्यामध्ये ते शेतीत वापरण्यासाठी R44 मॉडेलचे 4 सीटर हेलिकॉप्टर खरेदी करतील. या प्रकारचे हेलिकॉप्टर शेतीच्या देखभालीसाठी वापरले जाते. सध्या राजाराम त्रिपाठी माँ दंतेश्वरी हर्बल ग्रुपचे सीईओ आहेत. त्याची वार्षिक कमाई 25 कोटींवर पोहोचली आहे. राजाराम त्रिपाठी 400 आदिवासी कुटुंबांसह एकत्रितपणे 1000 एकर शेती करत आहेत. माँ दंतेश्वरी हर्बल ग्रुप युरोप आणि अमेरिकन देशांमध्ये काळी मिरी निर्यात करत आहे. राजाराम जे हेलिकॉप्टर विकत घेत आहेत. त्याचा उपयोग शेतात औषध शिंपडण्यासाठी केला जाईल. राजाराम पूर्वी बँकेत नोकरीला होता. आता त्यांचे संपूर्ण कुटुंब शेती करतात. सध्या राजाराम त्रिपाठी हे बस्तरचे पहिले शेतकरी ठरणार आहेत. ज्यांच्याकडे स्वतःचे हेलिकॉप्टर असेल.