सर्वसामान्य माणसांना जीवन जगताना ईच्छा असो वा नसो सुख दुःखाला सामोरं जावचं लागते. कधी ऊन कधी पाऊस हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यात सुखाला सामोरं जाताना सर्वकाही ठीक असते पण दुःखा ला सामोरं जाताना मात्र माणूस निराशेच्या तीव्र गर्तेत जातो आणि अजून दुःख अनुभवतो. कधी कधी न सुटणाऱ्या चक्र व्युहातही अडकतो. अशा वेळी दिव्य सत्पुरुषांचे विचार आणि मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरते.
गिरनार श्रीगुरु दत्तात्रेय भगवान, गुरुगोरक्षनाथ व संत गुलाबराव महाराज यांच्या कृपा आशिर्वादामुळे तसेच पद्मश्री माननीय डॉ विजयजी भटकर यांच्या मार्गदशनाने, सकारात्मक साधभावनिक विचार या मार्गाचा प्रचार, प्रसार ध्यानगुरू आदरणीय रघुनाथ यमुल गुरुजी करीत आहेत. आपल्या जीवनामध्ये सात्विक, सकारात्मक, सद् भावनिक विचारांचा प्रामाणिक प्रयत्न केल्यास आपलेच जीवन आनंदी व यशस्वी होण्याचा हाच खरा राजमार्ग ठरतो. असा मोलाचा संदेश आदरणीय रघुनाथ यमुल गुरुजी देतात.
सकारात्मक, सदभावनिक विचारांचा सातत्याने अवलंब केल्यास आपल्या विचारसरणी आणि जीवनशैली मध्ये अमूलाग्र, मंगलमय बदल घडून येतात. आणि आपल्या जीवनातील सद्गुण जसे की नैतिकता, सात्विकता, अहिंसा, करुणा, दया, क्षमा, शांती यांचा विकास होऊन आपल्या जीवनात सुख व समृद्धी नांदू लागते. जीवनात येणाऱ्या संकट आणि अपयशा मुळे येणारी नकारात्मकता मानवी मनावर षड्रिपूंचा प्रभाव वाढविते आणि मनुष्य दिशाहीन भरकटू शकतो अशा वेळी सद्भावना आणि सकारात्मक विचार मनावरील काजळी दूर करून मनाची शुद्धता वृद्धिंगत करतात.
तसेच शरीरातील सप्तचक्र शुद्धी होवून एका स्वानंदमय ऊर्जेची पॉज़िटिव औरा अनोखी अनुभूती मनुष्यास येते. अशी अनुभूती प्राप्त झाल्यावर विवेक जागृती होवून आत्म बुद्धीचे चित्तावर आणि चित्ताचे पंच इंद्रियांवार नियंत्रण येते… आणि मनुष्य षड् रिपूंना वश करून मानवी जीवनाचे ईश्वर अपेक्षित सर्वोच्य ध्येय प्राप्त करतो. असा मनुष्य आपल्या अस्तित्वाने समाजात सात्विकतेचा सकारात्मक प्रचारक तर बनतोच तसेच आणि वैयक्तिक अध्यात्मिक उन्नती साधतो व सेवाभावी ने समाजकल्याण लोककल्याण दिव्यांग व गरजो लोकांच सेवा करती असा बहुमूल्य संदेश नवं वर्षांच्या निमित्ताने आदरणीय रघुनाथ यमुल गुरुरजींनी दिला आहे.
रघुनाथ येमूल गुरुजी म्हणजे गुरुतुल्य आध्यात्मिक व्यक्तिमत्व
‘रंजल्या गंजल्यांची सेवा हिच खरी ईश्वरसेवा’ हा संदेश देणार्या येमुल गुरुजींचे व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. उत्तम संशोधक, दानशूर व्यक्ती, ऑरा रीडर, स्पिरिचुअल हिलर, हस्तरेषा तज्ज्ञ असे अनेक पैलू लाभलेले गुरुजी अध्यात्माबरोबरच सामाजिक विज्ञान, संशोधन, शिक्षण, कृषी, संस्कृती, कला, क्रीडा, आरोग्य व पर्यावरण संवर्धनासाठी सदैव कार्यरत असून दिव्यांग कल्याणासाठी गुरुजींनी दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँन्ड इडस्ट्री,ची स्थापना केली आहे.
येमूल गुरुजींचे सर्वात महत्वाचे योगदान म्हणजे त्यांनी केलेली ‘नीती सांप्रदायाची’ स्थापना होय. नैतिकता, सात्विकता, अहिंसा, करुणा, सुसंस्कार, परिश्रम, स्वावलंबन, परमार्थ आणि जनसेवेची शिकवणूक देणे, हे नीती संप्रदायाचा मुख्य उद्दिष्ट असून हजारो लोक नीती संप्रदायामुळे सन्मार्गाला लागले आहेत. आध्यात्म आणि विज्ञानाच्या आधारे तरुणांना करिअरविषयी मार्गदर्शन करतात.
गुरुजींच्या मते, येणाऱ्या काळात ‘रिसर्च इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट’ अर्थात ‘संशोधन विमा गुंतवणूक’ केल्यास देशाची मोठी प्रगती होईल.’अन्ना सुरक्षा विमा योजना’ ही गुरुजींची संकल्पना गोरगरिबांसाठी नक्कीच लाभदायक ठरणारी आहे. अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून जनसामान्यांचे जीवन सुखकारक करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणारे रघुनाथ येमूल गुरुजी म्हणजे अलौकिक गुरुतुल्य व्यक्तिमत्व आहे.