मुंबई – पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारी प्रगती मान्य होणारी नसल्याने आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला विरोधकांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारने हा निर्णय अहंकारातून घेतला असल्याची टीका करत यामुळे ४००० कोटींचे नुकसान होईल असा आरोप केला आहे.
दरम्यान, या आरोपवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका करण्यापेक्षा फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले पाहिजे’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले,’आम्ही पंतप्रधान मोदी यांचा राष्ट्रीय कार्यक्रम राबवला आहे. गंगा शुद्धीकरण, जंगल वाचवा, वाघ वाचवा, हे सर्व पंतप्रधान मोदींचे कार्यक्रम आहे. त मुंबईतील फुफ्फुस असलेल्या जंगलाला आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे यात अहंकाराचा मुद्दाच येत नाही. उलट फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन करायला पाहिजे होते’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला.’
काय म्हणाले फडणवीस?
आरे कारशेड कांजूरमार्गला हलवण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. सरकारने हा निर्णय अहंकारातून घेतल्याचेही ते म्हणाले.