राज्यपाल भगतसिंह कोश्यारी; सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका ठेवण्याची सूचना
सातारा – केंद्र व राज्य शासन सर्वसामान्यांना डोळ्यांसमोर ठेवून विविध योजना तयार करत असतात. या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका विभाग प्रमुखांनी घ्यावी, अशा सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्या. महाबळेश्वर हे भारतातील महत्वाचे पर्यटन स्थळ असून अधिक पर्यटक येण्यासाठी उत्तम सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली.
महाबळेश्वर येथील राजभवनातील दरबार हॉलमध्ये विविध विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर कोश्यारी बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उप वनसंरक्षक भरतसिंह हाडा, प्रांताधिकारी संगीता चौगुले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शिवभोजन थाळीला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून लोकांच्या अधिकच्या मागणीचा विचार करुन तसा प्रस्ताव पाठवावा. युवकांना उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहित करुन मुद्रा बॅंक योजनेंतर्गत जास्तीत जास्त वित्त पुरवठा करुन उद्योजक निर्माण करावेत. सातबारा संगणकीकरणाचे काम 98 टक्के 2017-2018 अखेर बॅकेच्या एनपीएचे प्रमाण 51 टक्के आहे, असा खुलासा बॅंकेने केला आहे. त्यामुळे 31 मार्च 2018 अखेर असणारी कर्ज सुरक्षित आहेत किंवा नाही याबाबतही चौकशी करण्याची गरज आहे. बॅंकेने विविध बाबींवर केलेल्या खर्चाचीही चौकशी लेखा परीक्षणावेळी होणार आहे. कराड जनता बॅंकेने काही निधी वर्ग केला आहे. त्याबाबतही चौकशीचे आदेश सहकार आयुक्तांनी दिले आहेत.
त्यानुसार बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेचे निर्बध आहेत. तरीही त्या कालवधीत 13 कोटी 29 लाखांच्या ठेवी परत केल्या आहेत. त्या कोणत्या नियम व निर्णयानुसार केल्या, कशा केल्या, त्याची चौकशी होणार आहे. ठेवी नियमबाह्य कर्जास वर्ग केल्या आहेत का, याची चौकशी करावी. कराड जनता बॅंकेची सध्याची स्थितीही समोर आलेली नाही. त्यामुळे ठेवीदार सभासद आर्थिक हिताच्या दृष्टीने मुद्याची चाचणी लेखापरीक्षण होऊन व्यवहार उघडकीस येण्यासाठीही चाचणी लेखा परीक्षण अत्यावश्यक आहे. त्यामुळे परीक्षण सखोल करावे, त्याचा अहवाल 30 एप्रिल 2020 पर्यत द्यावा, असे आदेशात म्हटले आहे.