दीड कोटी रुपयांचे 15 बंधारे मंजूर ः जूनपर्यंत सर्व बंधारे बांधून पूर्ण होणार
केंदूर – केंदूरसाठी तब्बल दीड कोटी रुपयांचे कोल्हापूर पद्धतीचे पंधरा बंधारे मंजूर करण्यात आले आहे. त्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे केंदूरची पाण्याची समस्या सुटणार
आहे.
येत्या दोन आठवड्यात तीन बंधारे पूर्ण होणार आहेत, तर उर्वरित बारा बंधारे जून अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. दरम्यान थिटेवाडी – कळमोडी बंद पाइपलाइन योजनेच्या आढावा बैठक मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे सुरू आहेत. तर कानिफनाथ योजना देखील अंतिम टप्प्यात आहे.
रासकर वस्ती, सुक्रेवाडी आणि जगताप वस्ती येथील तीन बंधाऱ्याची कामे सरपंच वंदना ताठे आणि जयश्री सुक्रे यांच्या हस्ते नुकतीच सुरू झाली आहेत. यावेळी उद्योजक प्रमोद पऱ्हाड, सतीश साकोरे, अभिजित साकोरे, घनःश्याम गाडेकर, शिवाजी भोसुरे, भाऊ साहेब पऱ्हाड, बाळासाहेब साकोरे, सतीश थिटे, जयदीप ताठे, आबासाहेब पऱ्हाड, गणेश थिटे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या कामासाठी प्रामुख्याने सूर्यकांत थिटे, तुकाराम थिटे, युवराज साकोरे, भारत साकोरे, भाऊसाहेब थिटे, बन्सी पऱ्हाड, अशोक पऱ्हाड, रामशेठ थिटे, गोविंद साकोरे, महेश गावडे, महादेव ताठे, उमेश साकोरे, अमोल सोनवणे यांसह अनेक युवकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.