मुंबई – शिवसेनेशी बिनसल्याने महाराष्ट्राच्या सत्तास्पर्धेतून भाजप रविवारी बाहेर पडला. त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले. त्यामुळे आता चेंडू शिवसेनेच्या कोर्टात गेला आहे. मात्र, शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची मदत घ्यावी लागणार आहे. अरविंद सावंत यांच्या रूपाने केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेचा एक मंत्री आहे. सावंत यांना राजीनामा द्यावा लागेल, असे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले होते. यानुसार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
Shiv Sena MP Arvind Sawant: BJP went back from their pre election promises. It would not have been morally right for me to continue in the Centre, so I have resigned as Union Minister. pic.twitter.com/qZLt46dFFC
— ANI (@ANI) November 11, 2019
अरविंद सावंत यांनी म्हटले कि, ३० मे रोजी कै. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने मी केंद्रात अवजड उद्योग खात्याची जबाबदारी स्वीकारली.
गेल्या सहा महिन्यांपासून मी या खात्याचा कार्यभार सांभाळतो आहे. मात्र महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरेंनाच खोटं ठरवण्याचा प्रयत्न भाजपाकडून झाला. त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देतो आहे, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेना एनडीएतून बाहेर पडेल का? या प्रश्नावर अरविंद सावंत म्हणाले कि, मी राजीनामा दिला यातच सगळे आले, असे सूचक वक्तव्य सावंत यांनी केले आहे.