नगर -करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे मार्च ते जून महिन्याचे वीज बिल माफ करा अशी, मागणी आम आदमी पार्टी च्या वतीने करण्यात आली.
याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ऍड.जावेद काझी, भरत खाकाळ, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले, रवी सातपुते, संपत मोरे, प्रकाश फराटे, संदीप कनोजिया आदी उपस्थित होते.
करोना संकटाशी डॉक्टर, वैद्यकिय क्षेत्रातील कर्मचारी, परिचारिका, पोलीस प्रशासन व महसूल कर्मचारी लढा देत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या रक्षणासाठी हे योध्दे देत असलेले योगदान अतुलनीय आहे. तसेच राज्यातील उद्योग, व्यापार व बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे व्यापारी, कामगार, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.