नगर -तालुक्यातील कामरगाव येथे गेल्या तीन महिन्यापासून वायरमन नसल्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामे खोळंबली आहेत. विजेच्या वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे शेतकऱ्याना पिकाला पाणी देताना अडचणी निर्माण होत आहेत. महावितरणच्या या गलथान कारभारला ग्रामस्थ वैतागले असून येत्या 10 दिवसात वायरमन मिळाला नाही तर नगर पुणे महामार्गावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी सरपंच गणेश साठे यांनी महावितरण विभागाला दिला आहे.
कामरगाव येथील वायरमन तीन महिन्यापासून वैद्यकीय रजेवर गेल्यामुळे ग्रामस्थांनची विजेअभावी हाल होत आहे. कामरगाव तलावात पुरेसा पाणीसाठा आहे. शेतकऱ्यांनी पिकाचे नियोजन केले होते. गावाला पिन्यासाठी भरपूर पाणी असून, सध्या वारंवार जाणाऱ्या वीजेमुळे पाणी येण्यास विलंब होत आहे., लॉकडाऊनमुळे बरेच लोक घरी असतात.
मात्र, दुपारच्या उन्हाच्या वेळेतच वीज गायब होत असल्याने गावकरी, लहान मुले व वयोवृद्ध लोकांचे खूप हाल होत आहेत. या संदर्भात महावितरणचे अधिकारी नितीन धर्माधिकारी व किसन कोपनर यांच्याकडे माजी सरपंच गणेश साठे, दत्ता साठे, बाप्पू जाधव, अरविंद साठे, एकनाथ चौरे, दिलीप नाणेकर, संतोष शिंदे, सोपान आंधळे, शिवा सोनवणे, दीपक चौरे, भरत साळी, शेखर सावंत, शंकर कातौरे यांनी निवेदन दिले आहे.
आठ ते दहा दिवसात मान्सून पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी महावितरणकडून वीज वाहक तारांचे अडथळे दूर केले जातात. परतू गावात वायरमेन नसल्याने या सर्व कामावर मर्यादा आल्या आहेत. आ. निलेश लंके यांना लेखी निवेदन देखील देण्यात आले आहे. 10 दिवसात प्रश्न न सुटल्यास आम्ही नगर-पुणे रस्त्यावर आंदोलन करणार आहोत.
गणेश साठे माजी सरपंच कामरगाव