सोमवारच्या अन्न नियंत्रणामुळे खाणावळीत जेवणाऱ्यांत असंतोष
पुणे, ता. 19 – दर सोमवारी सायंकाळी पाच वाजल्यानंतर नियंत्रित अन्नपदार्थ वाढण्यास महाराष्ट्र सरकारतर्फे जी बंदी करण्यात आली आहे ती विरुद्ध खाणावळी जेवणाऱ्या लोकांत व खाणावळवाल्यांतही असंतोष दिसून आला.
उपवासाचे काय?
खाणावळातच नेहमी जेवणारे जे लोक आहेत ते म्हणाले, की सोमवार हा श्रावण महिन्यात अनेकांच्या उपवासाचा दिवस असतो. अनेक लोक असे आहेत की जे दिवसा कडक उपवास करतात वा उपवासाचे पदार्थ खातात आणि रात्री जेवून उपवास सोडतात. सरकारच्या निर्बंधामुळे या लोकांची फार पंचाईत होणार आहे. सरकारच्या निर्बंधाप्रमाणे फक्त बटाटे, रताळे, शेंगदाणे इत्यादींचे पदार्थ सोमवारी सायं. 5 नंतर वापरण्याची परवानगी आहे. “म्हणजे आम्ही उपवासाची पद्धत उलटी करावी असे सरकारचे म्हणणे आहे का?’ असे काहीजण म्हणाले.
देशाच्या अर्थव्यवस्थेत समृद्धीसाठी सहकारी क्षेत्रास महत्त्वपूर्ण स्थान
मुंबई – देशाच्या अर्थव्यवस्थेत सहकारी क्षेत्रास महत्त्वपूर्ण स्थान असून, आर्थिक समृद्धीचे ध्येय प्राप्तीसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजवावयाची आहे, अशा आशयाचे उद्गार केंद्रीय अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आज
येथे काढले.
मोझांबिकमध्ये आफ्रिकनांची कत्तल झाल्याचा काएटानोकडून इन्कार
लंडन – ब्रिटनच्या पंतप्रधानांचे भेटीस आलेले पोर्तुगीज पंतप्रधान मि. मार्सेली काएटानो यांनी त्यांच्या आफ्रिकेतील मोझांबिक वसाहतीत आफ्रिकन लोकांची कत्तल करण्यात आल्याच्या बातमीचा साफ इन्कार केला. ते म्हणाले, आमच्या आफ्रिकेतील वसाहती मोझांबिक, अंगोला व गिनी येथे स्वातंत्र्याची चळवळ चालू आहे. परंतु या वसाहती सोडून देण्याचा पोर्तुगीज सरकारचा मुळीच विचार नाही.