जनतेच्या पाठिंब्यावर पंतप्रधान होईन!
अहमदाबाद, दि. 03 – गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाबाबत जनता आघाडी उत्सुक नाही, असे मोरारजी देसाई यांनी येथे स्पष्ट केले. ते म्हणाले, जनतेच्या पाठिंब्यावर मी पंतप्रधानपद स्वीकारीन; पण मुख्यमंत्रिपद नाही.
गरीब शेतकरी नष्ट झाला तर देशाचा आत्मघात
पुणे – काळाच्या धावात गरीब शेतकरी नष्ट होईल, असा जर कोणाचा समज असेल तर तो या शेतीप्रधान देशाला आत्मघातक ठरेल, असा इशारा प्रा. एन. डी. पाटील यांनी वसंत व्याख्यानमालेत “महाराष्ट्रातील गरीब शेतकऱ्यांचे भवितव्य’ या विषयावर बोलताना दिला.
“राहील त्याचे घर’ हे तत्त्व भाडेकरूंना लावा
पुणे – काळाची पावले ओळखून सरकारने “कसेल त्याची जमीन’ या तत्त्वाप्रमाणे “राहील त्याचे घर’ अशा दृष्टीने भाडे नियंत्रण कायद्याची पुनर्रचना करावी, अशी मागणी घर भाडेकरू संघाच्या सभेत एका ठरावाद्वारे केली आहे.
स्वातंत्र्य मिळेपर्यंत तोमिवियाचा लढा
नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिकन सरकारच्या आधिपत्याखाली सध्या असलेल्या तोमिवियाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळेपर्यंत तोमिवियन लोकांचा सशस्त्र लढा चालूच राहील. नामिवियाचे नेते मि. रुपिया बंडा यांनी सांगितले. बंडा यांनी सहा दिवसांची भारत भेट संपविली आहे.