भारतीय पातळीवरील नोकऱ्यांत मराठी लोक अत्यल्प
पुणे, दि. 13 – भारतीय पातळीवरील नोकऱ्यांत मराठी लोकांचे प्रमाण केवळ दीड टक्का आहे. या घटनेची गंभीर दखल घेण्याची वेळ आल्याची अगत्याची सूचना बॅ. शेषराव वानखेडे यांनी केली. ते पुढे म्हणाले, मराठी माणूस कुठे कमी पडतो याची कारणे शिक्षण संस्थांबरोबरच इतरांनीही शोधली पाहिजेत व योग्य दिशेने प्रयत्न केले पाहिजेत.
दिएगोगार्सिया तळ तूर्त सुसज्ज करू नका
वॉशिंग्टन – दिएगोगार्सिया हा तळ बळकट करण्याचे काम पुढे ढकलावे व रशियाबरोबर वाटाघाटी सुरू कराव्यात, अशी सूचना अमेरिकेकडून केली आहे.
देशभर खरीप हंगामाची सुरुवात चांगली
नवी दिल्ली – यंदा पाऊस वेळेवर आल्यामुळे देशात सर्वत्र खरीप हंगामाची सुरुवात चांगली झाली आहे. खरीप हंगामात जास्तीत जास्त उत्पादन व्हावे या दृष्टीने केंद्रीय कृषिमंत्री जगजीवनराम यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत.
सहकार क्षेत्र शुद्ध ठेवा
लातूर – सहकार खात्याची थकबाकी व अफरातफरीच्या प्रकराच्या बाबतीत अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. तेव्हा सहकार क्षेत्रातील सभासद, कार्यकर्त्यांनी सहकार क्षेत्र शुद्ध कसे राहील याची काळजी घेतली पाहिजे, असे उद्गार सहकारी बॅंक संचालक श्रीश्रीमाळ यांनी काढले.