मुंबई : राज्यसभा निवडणुकांच्या सुरवातीपासून ते अगदी निकाल लागेपर्यंत नाट्यमय घडामोड़ी घडल्या. या निवडणुकीत भाजपचे तीन आणि महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले. त्यानंतरही निवडणुकीच्या परिणामांवरून राज्यात एकमेकांवर जोरदार शेरेबाजी सुरू आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर संजय राऊत यांनी अपक्षांना लक्ष्य केलं. आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बच्चू कडू म्हणाले की, अपक्षांना बदनाम करून नाही चालणार, काही अपक्ष सोबतही होते. मात्र रिस्क न घेता आपापल्या उमेदवाराला जास्त मतं टाकण्याच्या नादात महाविकास आघाडीचा गेम बिघडल्याचं बच्चू कडू नमूद केलं.
शिवसेनेला आठ ते नऊ मत कमी पडली. संजय राऊतांना 41 मतांवर ठेऊन शिवसेनेने रिस्क घेतली, मात्र इतर पक्षाने तसं केलं नाही. त्यामुळे हा निकाल आला. ज्या आमदाराचं सभासदत्व कायम आहे. पण त्यांना मतदानाचा अधिकार नाही, हा कोर्टाचा निकाल अनाकलनीय असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं.
दरम्यान अपक्ष आमदारांवर घोडेबाजारासह ईडी किंवा सीबीआयचा दबाव असू शकतो, अशी शंकाही बच्चू कडू यांनी व्यक्त केली. त्यामुळे कोणाला जबाबदार ठरवण्यापेक्षा प्रत्येकाने समजून घ्यायला अस ते पुढं म्हणाले.