तुळजापूर : राज्यसभा निवडणुकीच्या सुरवातीपासून ते अगदी निकाल लागेपर्यंत नाट्यमय घडामोड़ी घडल्या. या निवडणुकीत भाजपचे तीन आणि महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले. काही काळासाठी महाविकास आघाडी सहावी जागा जिंकेल अस वाटत असताना भाजपने बाजी मारली. त्यामुळे शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. यानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. त्यात आता मनसेची भर पडली असून बाळा नांदगावकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
आता तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पक्ष चालवायला हवा. आजूबाजूच्या लोकांनी पक्ष चालवू नये. अजूनही वेळ गेलेली नाही, असा टोला नांदगावकर यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
पूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या आदेशाने सर्व घडत होतं. मात्र आता ते दिवस राहिले नाहीत. काही लोक स्वतःला पक्षप्रमुख समजून पक्ष चालवत आहेत. त्यामुळे हीच का ती शिवसेना अशी म्हणण्याची वेळ आली, असही नांदगावकर यांनी नमूद केलं. तसेच राज्यसभेच्या निकलातून शिवसेना आत्मचिंतन करून धडा घेईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
बाळा नांदगावकर सहकुटुंब तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला गेले होते. त्यावेळी ते बोलत होते.