कोलंबो – श्रीलंकेत सध्या आर्थिक संकट ओढावलेले असून राजकिय अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे श्रीलंकेतील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या संकट काळात श्रीलंकेचा दिग्गज माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या हा सर्वसामान्यांना पाठिंबा दर्शवत आंदोलनात सहभागी झाला. याच दरम्यान, सनथ जयसूर्याने मदत आणि समर्थनासाठी भारताचे आभार मानले आहेत.
सनथ जयसूर्या म्हणाला, आर्थिक संकटाच्या सुरुवातीपासूनच भारताने श्रीलंकेला मदत केली आहे. त्यामुळे आम्ही भारताचे आभारी आहोत. या संकटात भारताने मोठी भूमिका बजावली आहे. मला वाटते की श्रीलंकेत काय चालले आहे? याकडे सर्व देश बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असे सनथ जयसूर्या म्हणाला.
तमिळनाडूतील अद्रमुकमध्ये गृहकलह; पनीरसेल्वम यांची हकालपट्टी
दरम्यान, देशावरील राजकीय संकट दूर झाले असून नागरिकांनी शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्रीलंकेचे लष्करप्रमुख जनरल शैवेंद्र सिल्वा यांनी केले. सध्याच्या प्रश्नांवर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याची संधी आता उपलब्ध आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्षे यांच्या सरकारी निवासस्थानी घुसलेल्या आंदोलकांना तेथे एक कोटी 78 लाख रुपये सापडले. आंदोलकांनी ही रक्कम पोलिसांच्या ताब्यात दिली आहे.