राजगुरुनगर – साबुर्डी (ता. खेड) येथे जनावरांसाठी साठवणूक केलेल्या चाऱ्याच्या वळईला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी (दि.21) दुपारी घडली. स्थानिक नागरिकांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले; मात्र आगीची तीव्रता जास्त असल्याने संपूर्ण चारा व तीन हापुस आंब्याची झाडे आगीत जळून खाक झाली आहेत यात शेतकऱ्यांचे सुमारे एक लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
साबुर्डी येथे दत्तात्रय हुरसाळे या शेतकऱ्याने उन्हाळ्यासह पावसाळ्यामध्ये जनावरांना चाऱ्याची वळई रचून साठवण केली होती. यात 2 हजार कडबा, 3 हजार गवत, 2 हजार बाजरी सरमाड अशे एकत्रित वळई रचली होती. अचानक आगीत हा सर्व चारा आगीच्या भस्मस्थानी झाला शेतकऱ्यापुढे मोठे संकट उभे राहिले आहे. एकीकडे करोनामुळे शेतकरी हैराण झाला असताना आता या शेतकऱ्याचा चारा जळून खाक झाल्याने त्याच्या पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महसूल विभागाकडू या जळीताचा पंचनामा करण्यात आला आहे. तर आगीचे कारण समजू शकले नाही