नवी दिल्ली : देशावर सध्या बिपरजॉय चक्रीवादळाचे सावट आहे. त्याचा तडाखा देशच्या काही राज्यांना बसत आहे. दरम्यान, पार्श्वभूमीवर अनेक राज्यांना भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यातच आसामची राजधानी गुवाहाटीसह ईशान्य भारताच्या इतर भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दरम्यान, बांगलादेशमध्येही भूकंपाचे धक्के जाणवलई असल्याचे सांगण्यात येत आहे.
बांगलादेशातील भूकंपाची तीव्रता 4.8 इतकी होती. त्याचे केंद्र जमिनीपासून ७० किलोमीटरवर असल्याचे सांगितले जात आहे. म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या मणिपूरच्या डोंगराळ उखरुल भागात मंगळवारी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (एनसीएस) म्हटले होते की, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4 एवढी होती.
एनसीएसने सांगितले की, ईशान्य उखरुल जिल्ह्यातील डोंगराळ भागात आणि लगतच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले.पृष्ठभागापासून 10 किमी खोलीवर आले. आसामच्या मध्यवर्ती भागात रविवारी, ११ जून रोजी सकाळी ३.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, सकाळी 11.35 वाजता भूकंप झाला आणि त्याचा केंद्रबिंदू ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तरेकडील सोनीपूर जिल्ह्यात होता.
बुलेटिननुसार, भूकंपाचे केंद्र जमिनीपासून पाच किलोमीटर खोलीवर होते. ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिण किनार्यावरील मोरीगाव, नागाव आणि पश्चिम कार्बी आंगलांग याशिवाय जवळच्या दररांग, लखीमपूर आणि उदलगुरी जिल्ह्यातही लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले.