हिंगोली (शिवशंकर निरगुडे ) : हिंगोली जिल्हयात आज सकाळी भूकंपाचे धक्के बसल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात सलग दोन धक्के बसल्याने अनेक गावातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी तालुक्यातील अनेक गावांना आज सकाळी 7 वाजून 5.मिनिटांनी भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. दरम्यान,.कुठे ही नुकसान झाले नाही, मात्र नागरीकांत भीतीचे.वातावरण आहे. जिल्ह्यातील कुरुंदा, कवठा, कोठारी, पांग्रा, शिंदे, शिरळी, यासह नांदापूर, पिंपळदरी व लक्ष्मनतांडा. कूपटी, वापटी, जलालधाबा , हिंगनी , खेड , जिल्ह्यातील अनेक गावात आज सकाळी 7 वा .5 मिनिट आणि 7वा 12 मिनिटां दरम्यान भूगर्भातून आवाज येत जमीन सौम्य प्रमाणात हादरली गेली. त्यामुळे सकाळी नागरीक खडबडून जागे झाले. भूकंप झाला अशी चर्चा सुरू झाली.
हिंगोली जिल्ह्यात मागील चार ते पाच वर्षांपासून भुगर्भातून आवाज येण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. अचानक जमिनीतून गडगडाटाचा आवाज येऊन जमीन हादरण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. सुदैवाने आजपर्यंत या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी वा वित्तहानी झाली नाही. मात्र आज सकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी भुगर्भातून मोठा आवाज झाला. त्यानंतर सात मिनिटांनी लगेचच सात वाजून 12मिनिटांनी दुसरा आवाज झाला आहे.
या भूकंपाची खोली भूगभात 10 किलोमीटर एवढी असल्याचे भुकंप मापकामध्ये नोंद झाली आहे. अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने दोन वेळा आवाज झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाला वेळोवेळी या आवाजाबद्दल माहिती दिल्यानंतरही त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासन देखील हतबल झाले आहे. या परिसरात मागील सहा ते सात वर्षांपासून जमीनीमधून गुढ.आवाज येत आहेत. मात्र हे आवाज नेमके कशामुळे येत आहेत.याची माहिती अद्यापही गावकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे हे गुढ आवाज आता गावकऱ्यांच्या अंगवळणीच पडले आहेत..प्रशासनाने या भागात पाहणी करून आवाजाचे नेमके कारण.शोधून त्याची माहिती गावकऱ्यांना द्यावी अशी मागणी जिल्ह्यातील ग्रामस्थांकडून केली जात आहें