नागपूर – माझ्या बंडखोरीचे यश म्हणजे दिव्यांग मंत्रालय आहे. या सरकारने दिव्यांग मंत्रालय दिले, याचा मनस्वी आनंद आहे. मी आधी न्यायालयाच्या तारखा ऐकत होतो, आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखा ऐकत आहे, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करत प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगाविला आहे.
नागपुर येथील सिंचन विभागाच्या विश्रामगृह येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बच्चू कडू म्हणाले, माझ्या वाट्याला काय आले, हे महत्वाचे नाही. तर माझ्या दिव्यांग बांधवांच्या वाट्याला मंत्रालय ही माझ्या आयुष्यातील मोठी गोष्ट आहे. निवडणूक आयोग आणि न्यायालय यांचे “तारीख पे तारीख’ सुरू आहे. निकाल येत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असे चित्र दिसत आहे. या निकालानंतरही विस्तार झाला नाही, तर मग तो 2024च्या निवडणुकांनंतर होईल, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
या विषयावर आम्ही काही चर्चा केली नाही आणि कुणाशी बोललोही नाही. पण सध्या न्यायालय किंवा आयोगाचा निकाल लागल्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही, तर तो 2024च्या निवडणुकांच्या नंतर होईल, असे आपल्याला का वाटते? असे विचारले असता, आता या सरकारची मुदत संपण्यासाठी एक वर्षाचा कालावधी राहिलेला आहे.
Maharashtra : ठरल! नवनियुक्त राज्यपाल ‘रमेश बैस’ यांचा ‘या’ तारखेला होणार शपथविधी
त्यातलेही शेवटचे सहा महिने निवडणुकीच्या तयारीत जातात. मग थोड्या कालावधीसाठी कशाला करायचा विस्तार? त्यामुळे मग कदाचित नाही करू. आमचे मंत्री सक्षम आहेत राज्याचा कारभार चालवण्यासाठी आणि सरकार चांगले निर्णय घेत आहे, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.