-ह.भ.प. गणेश म. भा. फड
आणि सर्वमात्री निंदा । सांडूनि आस्था पै शुद्धा । गीताश्रवणी श्रद्धा । उभारी जो ।। तयाच्या श्रवणपुरी । गीतेची अक्षरे जंव पैठीं । होतीना तंव उठाउठी पळेचि पाप ।।
श्री ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात संत ज्ञानेश्वर महाराज गीता श्रवणाचे महत्त्व सांगताना म्हणतात, जो मनुष्य सर्व मार्गांची निंदा सोडून, म्हणजेच कोणाचीही निंदा न करता शुद्ध निष्काम वृत्तीने गीताश्रवणाविषयी श्रद्धेची उभारणी करतो त्याच्या कानावर गीतेची अक्षरे पडताच त्याचे सर्व पाप निघून जाते.
माऊली पुढे म्हणतात,
जे इये गीतेची अक्षरे । जेतुलीं का कर्णद्वारे । रिघती तेतुले होती पूरे । अश्वमेध कीं ।। म्हणोनि श्रवणे पापें जाती । आणि धर्म धरीं उन्नती । तेणे स्वर्गराजसंपत्ती लाहेचि शेखीं।।
माऊली म्हणतात, या गीताग्रंथामधील जेवढी अक्षरे कर्मद्वारातून हृदयात येतात, तितके अश्वमेध यज्ञ पूर्ण होतात. म्हणून गीता श्रवण केली असता पाप नष्ट होतात. धर्माचा उत्कर्ष होतो आणि उत्तम गती प्राप्त होते.