Dwarka City । आपल्या सर्वांना माहीत आहे, की सुमारे हजारो वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णाने ‘द्वारका’ शहराची स्थापना केली होती. गोमती नदीच्या काठावर बांधलेले हे मंदिर अतिशय सुंदर आणि अप्रतिम आहे.
सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी जेव्हा भगवान श्रीकृष्णाने द्वारका शहराची स्थापना केली होती, तेव्हा त्यांचा मुख्य राजवाडा म्हणजेच ‘श्री हरिगृह’ होते त्या ठिकाणी भगवान द्वारकाधीश मंदिर नव्याने बांधण्यात आले होते. । Dwarka City
मंदिराच्या गर्भगृहात शुद्ध चांदीच्या सिंहासनावर विराजमान भगवान श्रीकृष्णाची गडद रंगाची चार हात असलेली मूर्ती आहे. भगवान श्रीकृष्ण हातात शंख, चक्र, गदा, कमळ इत्यादी धारण करत आहेत. ही मूर्ती खूपच आकर्षक आणि सुंदर आहे.
असे मानले जाते की हे मंदिर सुमारे पंचवीसशे वर्षांपूर्वी श्रीकृष्णाचा पणतू वज्रनाभ याने बांधले होते, ज्याचा वेळोवेळी विस्तार आणि जीर्णोद्धार करण्यात आला. भारतातील गुजरातमधील द्वारकाधीश मंदिर हे प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी मानले जाते.
हे हिंदू धर्मातील प्रमुख चार धामांपैकी एक आहे. येथे भगवान श्रीकृष्णाची द्वारकाधीशच्या रूपात पूजा केली जाते. द्वारकाधीशचा मुख्य अर्थ ‘द्वारकेचा राजा’ असा आहे. द्वापार युगात हे स्थान भगवान श्रीकृष्णाची राजधानी होती. आणि येथील या मंदिरातील ध्वजपूजेला विशेष महत्त्व आहे.
वास्तुशास्त्रानुसार ते विशेष आहे – । Dwarka City
या मंदिराचे सध्याचे स्वरूप 16 व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. या मंदिराला जागृत मंदिर या नावाने सर्वजण ओळखतात. या मंदिराची दिशा, रचना आणि स्थान हे वास्तुशास्त्रातील एक उत्तम उदाहरण आहे.
या मंदिराची मुख्य गोष्ट म्हणजे मंदिरावरील ध्वज नेहमी पश्चिमेकडून पूर्वेकडे फडकत असतो. हे मंदिर प्रामुख्याने चुनखडीपासून बनविलेले आहे. त्यामुळे आजही त्याचे सौंदर्य टिकून आहे.
हे मंदिर एकूण 72 खांबांवर आधारित असून या मंदिराच्या शिखराची उंची 235 मीटर आहे. या मंदिराच्या रचनेतून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा प्रत्येक प्रकारची शांती प्रदान करते.
त्याच्या प्रभावामुळे भक्तांच्या मनात नेहमी सकारात्मक विचार येतात आणि नकारात्मक विचार निघून जातात. या मंदिराच्या मुख्य गर्भगृहाची आणि मंडपाची रचनाही वास्तू लक्षात घेऊन करण्यात आली आहे. त्याच्या प्रभावामुळे तेथे जाणारे भाविक मंत्रमुग्ध होतात.
84 फूट उंच सूर्य-चंद्र ध्वज – । Dwarka City
या सात मजली मंदिराच्या शिखरावर फडकणारा धार्मिक ध्वज पाहून भगवान श्रीकृष्णाचे भक्त दूरवरून त्यापुढे मस्तक टेकतात. हा ध्वज सुमारे 84 फूट लांब असून त्यात अनेक प्रकारचे रंग असल्याचेही सांगितले जात आहे. या मंदिराच्या वर असलेल्या ध्वजावर चंद्र आणि सूर्याचे प्रतीक आहे.
असे म्हणतात की सूर्य आणि चंद्र हे भगवान श्रीकृष्णाचे प्रतीक मानले जातात, म्हणूनच त्यांच्या मंदिराच्या शिखरावर सूर्य आणि चंद्र चिन्ह असलेला ध्वज नेहमी फडकतो. त्यामुळे भगवान द्वारकाधीशजी मंदिरावरील ध्वज दिवसातून सकाळ, संध्याकाळ आणि दुपारी तीन वेळा बदलला जातो.
या मंदिराचा ध्वज काढण्याचा आणि बसवण्याचा अधिकार अबोटी ब्राह्मणांना आहे. विविध रंगांचे ध्वज मंदिरातून नेहमी फडकवले जातात आणि काढले जातात. तुम्हाला देखील हा ध्वज भगवान श्रीकृष्णाला अर्पण करायचा असले तर किमान एक महिना आधी मंदिर समितीशी चर्चा करून तुम्हाला हा ध्वज अर्पण करता येतो.
द्वारकाधीश मंदिर भेटीच्या वेळा –
जर तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह किंवा मित्रांसह द्वारकाधीश मंदिराला भेट देण्याचा विचार करत असाल आणि तुमच्या सहलीला जाण्यापूर्वी द्वारकाधीश मंदिराच्या वेळा शोधत असाल,
तर आम्ही तुम्हाला सांगतो की द्वारकाधीश मंदिराला सकाळी 6.00 ते दुपारी 1.00 पर्यंत भेट द्या. संध्याकाळी 5.00 ते रात्री 9.30 मंदिर उघडलेले असते. जेव्हा तुम्ही द्वारकाधीश मंदिराच्या दर्शनासाठी याल तेव्हा तुमच्या प्रवासाला किमान दोन ते तीन नक्की द्या.
‘द्वारका’नगरी बुडण्याचे कारण काय होते? । Dwarka City
आख्यायिकेनुसार जरासंधाकडून लोकांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने मथुरा सोडली. श्रीकृष्णाने समुद्रकिनारी आपली दिव्य नगरी स्थापन केली. या शहराचे नाव ‘द्वारका’ होते. महाभारतानंतर 36 वर्षांनी द्वारका शहर समुद्रात बुडाले असे मानले जाते.
महाभारतात पांडवांचा विजय झाला आणि सर्व कौरवांचा नाश झाला. यानंतर हस्तिनापुरात युधिष्ठिराचा राज्याभिषेक होत असताना श्रीकृष्णही तेथे उपस्थित होते. तेव्हा गांधारीने महाभारत युद्धासाठी श्रीकृष्णावर दोषारोप केला आणि श्रीकृष्णाला शाप दिला की,
‘तुझा वंशही नष्ट होईल. तेही तुमच्या डोळ्यांसमोर नष्ट होईल. या शापामुळे श्रीकृष्णाची द्वारका नगरी पाण्यात बुडाली होती असे म्हणतात. याबद्दल अनेक आख्यायिका सांगण्यात आल्या आहे.