Dr. Namdev Kirsan । क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठे लोकसभाक्षेत्र म्हणून गडचिरोली-चिमूर क्षेत्राची ओळख त्यामुळे निवडणूक प्रचारादरम्यान उमेदवारांना प्रत्येक भागात पोहोचणे शक्य होत नाही. त्यात यंदा मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, आता काँग्रेसकडून या मतदारसंघासाठी डॉ.नामदेव किरसान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी किरासान यांच्यावर पक्षाने दोन वेळा अविश्वास दाखवला होता. मात्र यावेळी पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवून निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.
राजकारणातून उत्तम समाजकारण Dr. Namdev Kirsan ।
वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी या राजकारणाचा पुरेपूर वापर करणारे डॉ. नामदेव किरसान हे यंदाच्या निवडणुकीत उतरेल आहेत. उच्चशिक्षित असलेले किरसान हे गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोलीच्या राजकारणात सक्रिय आहेत. या काळात राजकारणातून उत्तम समाजकारण करता येते, हे त्यांनी दाखवून दिलय. उच्चपदस्थ नोकरीला राम राम ठोकत त्यांनी वेगळा मार्ग निवडला. गडचिरोली जिल्ह्यातील गावागावांत त्यांनी आपल्या कामाच्या आधारे अनेकांची मने जिंकली.
डॉ.नामदेव किरसान याना दोन वेळा पक्षाकडून नकार Dr. Namdev Kirsan ।
नामदेव किरसान हे मूळचे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव इथल्या अतिदुर्गम भागातले रहिवासी आहेत. गरीबीसोबत संघर्ष करत उच्चशिक्षण घेतलं आणि प्राध्यापक झाले. ते नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. पण, त्यांनी नोकरी सोडून आमगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची वाट धरली.
वर्ग एकचे अधिकारी म्हणून 18 वर्ष नोकरी केली. पण, ती नोकरी देखील सोडली आणि राजकारणात पूर्णवेळ सक्रीय झाले. तेव्हापासून ते जिल्ह्यात काँग्रेससाठी काम करत आहेत. 2014 आणि 2019 ला त्यांनी काँग्रेसला लोकसभेची उमेदवारी मागितली. पण, त्यांना मिळाली नाही. तरीही त्यांनी काँग्रेसचं काम सुरूच ठेवलं.
गेल्या दहा वर्षांत मतदारसंघ पिंजून काढला. इतकंच नाहीतर त्यांनी सिरोंचा ते सालेकसा अशी यात्राही काढली होती. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क मजबूत झालाय. त्यामुळे त्याचा फायदा पक्षाला होणार असल्याचे दिसून येतंय. त्यामुळेच त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडलीय. मात्र आता आगामी मतदानाचं नामदेव किरसान यांचे भविष्य निश्चित करेल तोपर्यंत या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.