मुंबई – कोल्हापूर आणि सांगली परिसरात पुरानं थैमान घातलं आहे. त्यानंतर आता पूरात अडकलेल्या नागरिकांना सरकारी यंत्रणांकडून धान्य आणि पाणी पुरवले जात आहे. मात्र, या मदत साहित्यावरही स्वत:ची आणि पक्षाची जाहिरात करणारे स्टिकर्स लावण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर आता सर्वबाजूंनी सरकारवर टीका केली जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीसुध्दा भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. स्टिकर्स लागले नव्हते, म्हणून सरकारकडून मदतीसाठी उशीर झाला अशी टीका आव्हाडांनी सरकारवर केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सरकार ला मदत द्यायला उशीर झाला, रागवू नका, स्टिकर्सच्या डिझाईन प्रिटिंगला उशीर लागला. त्यामुळे मदतीसाठी उशीर झाला. आता अत्यंयात्रा थोड्या थांबून करा, कारण तिरड्यांवरचे स्टिकर्स तयार नाहीत. आमदार प्रत्येक तिरडीला खांदा देणार असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.
सरकार ला मदत द्यायला उशीर झाला
*
रागवू नाका
*#stickers chya #Design#printing ला उशीर लागला
मग वाटायला उशीर लागला
*
आता #अंत्ययात्रा थोड्या थांबून काढा
कारण तिरड्यांवरचे #स्टिकर्स तयार नाहीत
*#सांगली #कोल्हापूर
टीप.. आमदार प्रत्येक तिरडीला खांदा देणार pic.twitter.com/ppCS6o6lDh— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 10, 2019
भाजपचे इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी धान्य आणि साहित्याच्या पॅकेटवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वत:चा फोटो असलेले स्टिकर्स मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या पॅकेटवर लावले. त्यानंतर सर्वच स्तरांतून भाजप सरकारवर टीकेची झोड उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.