Delhi Pollution – दिल्लीत तीव्र वायू प्रदूषण (Delhi Pollution) होत असताना शेजारच्या उत्तरप्रदेशातून दिल्लीत मोठ्या प्रमाणात धूर सोडणारी वाहने आणली दिली जाऊ नयेत अशी सूचना दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी उत्तरप्रदेश प्रशासनाला केली आहे. उत्तरप्रदेशातून डिझेलवर चालणारी वाहने (vehicles) दिल्लीत येणे बंद होणे आवश्यक आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
दिल्लीच्या विविध भागातील हवेच्या प्रदुषणाची (Delhi Pollution) स्थिती सध्या अत्यंत गंभीर बनली आहे. आनंद विहारच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ‘धोकादायक’ श्रेणीत गेल्यानंतर गोपाल राय यांनी आनंद विहार बस डेपो स्थितीचा आढावा घेतला.
ते म्हणाले की, दिल्लीमध्ये फक्त इलेक्ट्रिक बस आणि सीएनजी बस सुरू आहेत पण उत्तरप्रदेशातून डिझेलवर चालणाऱ्या जुन्या बसेस मोठ्या प्रमाणात आनंद विहार बस डेपोमध्ये पाठवल्या जात आहेत.
उत्तर प्रदेश सरकारला माझी विनंती आहे की, त्यांनी एवढा धूर सोडणारी वाहने पाठवणे थांबवावे.आम्ही सध्या दिल्लीतील सर्व बांधकामे बंद केली आहेत, बीएस 3 आणि बीएस 4 इंजिने असलेल्या वाहनांना दिल्लीत बंदी आहे,
पण तरीही ही वाहने बाहेरून येत आहेत, मी योगींना विनंती करतो की ते थांबवावे जेणेकरून वाहनामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवता येईल असे राय यांनी सांगितले.