मुंबई – राज ठाकरेंना माझी हात जोडून विनंती महाराष्ट्र पेटवू नका कोरोनाच्या संक्रमणाची दोन वर्षे संपल्यानंतर लोकांना काम लागलंय. त्यांच्या खिशात पैसे नाहीयत.गॅस पेट्रोल डिझेल महागलंय भाज्या, केरोसिन महाग झालंय खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून सर्वच महाग झालंय याबाबत तुम्ही काहीच बोलत नाहीत. असं म्हणत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला आणि मदरसे व मशिदींवरील वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे.
राज ठाकरेंना माझी हात जोडून विनंती महाराष्ट्र पेटवू नका
कोरोनाच्या संक्रमणाची दोन वर्षे संपल्यानंतर लोकांना काम लागलंय.
त्यांच्या खिशात पैसे नाहीयत.गॅस पेट्रोल डिझेल महागलंय
भाज्या, केरोसिन महाग झालंय खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून सर्वच महाग झालंय याबाबत तुम्ही काहीच बोलत नाहीत— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 4, 2022
यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले होते की,’गॅस, पेट्रोल, डिझेल महागलंय. भाज्या, केरोसिन महाग झालंय. खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून सर्वच महाग झालंय, याबाबत तुम्ही काहीच बोलत नाहीत?”असा प्रश्नही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
यापूर्वी,’लाव रे तो विडिओ आता लाव रे हा विडिओ दूध का दूध पानी का पानी’ असं म्हणत आव्हाड यांनी ट्विट करत राज ठाकरेंना आरसा दाखविण्याचं काम केल होत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. यावेळी त्यांनी शिवसेनेला देखील डिवचले. तसेच मशिदीवरील भोंग्यांच्या विषयाला हात घालत मनसैनिकांना हनुमान चालीसाचे स्पीकर लावण्याचं आवाहन केलं. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलं आहे.