नगर -वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे. दुष्काळावर मात करायची असेल तर वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करणे अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यातही लायनेस क्लबच्यावतीने विविध भागात वृक्षारोपण करणार आहोत. लायनेस क्लबच्यावतीने नेहमीच सामाजिक कार्यास प्राधान्य दिले आहे. पुढील काळातही असेच उपक्रम राबविण्यात येतील, असे प्रतिपादन लायनेस क्लब ऑफ मिडटाऊनच्या अध्यक्षा सुरेखा कदम यांनी केले.
लायनेस क्लब ऑफ मिडटाऊनच्यावतीने वृक्षारोपण व मास्क वाटप करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका संध्या पवार, सचिव शारदा होशिंग व खजिनदार सविता जोशी, छाया रजपुत आदी उपस्थित होते.
यावेळी वैष्णवमातेची ओटी व साडीचोळी अर्पण करून परिसरातील महिलांना रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी पवार म्हणाल्या, वृक्ष लावणे व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. यावेळी लायनेस मल्टी क्लबच्या व्हाईस प्रेसिडेंटपदी राजश्री मांढरे तसेच छाया रजपूत यांची मल्टिच्या कॅबिनेट ऑफिसरपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा रोप देऊन सत्कार करण्यात आला.