Congress On Arun Goel – निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आयुक्तपदाचा राजीनामा दिला आहे काय ? असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे.
निवडणूक आयोग ही एक निष्पक्ष संस्था असली पाहिजे, ती घटनात्मक संस्था आहे. अरुण गोयल यांनी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर नुकताच राजीनामा दिला. मी यासाठी चार संभाव्य कारणांचा विचार करू शकतो. एक म्हणजे, मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांच्यामध्ये काही मतभेद असू शकतात. | Congress On Arun Goel
दुसरे म्हणजे, आयोग चालवणारे मोदी सरकार त्यांना पसंत पडले नाही का? तिसरे, त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला आहे काय? आणि शेवटी ते भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत काय? यापैकी एक कारण असले पाहिजे. | Congress On Arun Goel
येत्या काही दिवसांत गोयल यांच्या राजीनाम्याबाबत आणखी स्पष्टता येईल, असे जयराम रमेश यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले की, मोदींच्या भारतातील प्रत्येक दिवस हा लोकशाही आणि लोकशाही संस्थांना अतिरिक्त धक्का देत आहे.
“इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मॅनिपुलेशन रोखण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेलच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाने ८ महिन्यांपासून भारतातील विरोधी पक्ष नेत्यांना भेटण्यास नकार दिला आहे. | Congress On Arun Goel