केंद्रिय गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार या दोन नेत्यांमध्ये अहमदाबादमध्ये खरंच भेट झाली असेल का, या एकाच विषयाने होळी आणि धुळवडीचे वातावरण ढवळून निघाले आहे. हे दोन नेते भेटले असतील तर ते नक्की कुठे, किती वेळ, त्यांच्या भेटीतले विषय कोणते होते आणि त्यावेळी त्यांच्यासोबत आणखी कोणकोण होते, या प्रश्नांनी गुजरातसह महाराष्ट्र ढवळून निघाला आहे.
महाराष्ट्रात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचे सरकार असून त्याचे शिल्पकार शरद पवार मानले जातात. भाजपा महाराष्ट्रात विरोधी पक्षात असून सत्तेतील तीनही पक्षांमध्ये सुरुवातीपासूनच कुरबुरी सुरू आहेत. अशातच वाझे प्रकरणाने ही कुरबुर चव्हाट्यावर आली आहे. अशा स्थितीत राज्यातल्या विरोधी पक्षाचा दुसऱ्या क्रमांकाचा प्रभावी नेता आघाडी सरकारच्या शिल्पकाराला भेटतो, यावरुन आता तर्क लढवणे सुरू आहे. त्यामुळे शहा-पवार भेटले की नाही, हा विषय आणखी काही दिवस माध्यमांना खाद्य पुरवणार आहे, हे नक्की.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांच्यात अहमदाबाद येथे गुप्त बैठक झाल्याची बातमी प्रकाशित केली होती. अहमदाबादमधील एका फार्म हाऊसवर त्यांच्यात भेट झाल्याची चर्चा होती. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांच्यात भेट झालेली आहे. पवारांनी मोदी यांना बारामती इथे कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं. दिल्लीत या दोघांची भेट झाली आहे. मात्र शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाल्याचं पहिल्यांदाच चर्चेत येतं आहे.
शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अहमदाबादमधून थेट मुंबईला आले. ते कोणालाही भेटले नाहीत. मात्र, आता एका गुजराती दैनिकात त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे. शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी निव्वळ अफवा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या कथित भेटीचा नेमका अर्थ? पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी टाकलेला लेटरबॉम्ब यांच्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे.
राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाला दररोज नवे वळण मिळते आहे. याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्तांची बदलीही करण्यात आली. परमबीर सिंह या माजी पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुखांवर यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
महाविकास आघााडीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांना साथीला घेत सरकार स्थापन केले होतं. मात्र अपेक्षित संख्याबळ सिद्ध करता न आल्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडलं होतं.