औरंगाबाद – मुख्यमंत्री म्हणतात की आमच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. पण मी राज्यातल्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्याचे पुरावे दिले. हजारो कोटींचे आरोप करूनही सगळ्या मंत्र्यांना क्लिन चीट दिली गेली. कुठलीही चौकशी केली गेली नाही. माझे आरोप खोटे निघाले तर महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेसमोर मी फाशी घेईन असे आव्हानही धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारला दिले आहे.
ते पुढे म्हणाले, पवार साहेबांचे पाऊल मराठवाड्यात पडले आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचे आगमन झाले. नियतीचा हा आशीर्वाद आहे. महाराष्ट्रात जेवढी विमानतळे पवारांनी बांधली तेवढे यांना गुजरातमध्ये बस स्टॅंड बांधता आले नाहीत. पुरोगामी महाराष्ट्रात शरद पवारांना कुणीही संपवू शकत नाही.
राजे गेले, सेनापती गेले, सरदार गेले. मात्र मावळे मात्र पवारांसोबत आहेत. छत्रपतींच्या घरात फूट पडण्याचा प्रयत्न करणारे अण्णाजी पंत होते. आज त्याच अण्णाजी पंतांना छत्रपतींचे वंशज शरण गेले. छत्रपतींचा भाजप प्रवेश तडीपार जेल मध्ये गेलेल्या व्यक्ती कडून झाला असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.