मुंबई – धारावीचा विकास ( Dharavi vikas ) झालाच पाहिजे, तिथल्या लोकांचे पुनर्वसन झालेच पाहिजे. ही शिवसेनेची ( Shivsena UBT ) आग्रही मागणी आहे. त्यामुळे बीडीडीचा विकास जसा म्हाडा करत आहे, तसा धारावीचा विकास सरकारने करावा, जर टीडीआर बँक करणार असाल तर ती सरकारची असावी, त्यात अदानीचा फायदा नसावा, असे परखड मत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी व्यक्त केले. येत्या १६ डिसेंबरला धारावी ते उद्योगपती अदानींच्या कार्यालयावर धडक मोर्चा ( dharavi to adani office morcha ) काढण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.( Uddhav thackeray on adani )
ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. पीक विमा घोटाळा वेगळा विषय आहे. त्यावर बोलेनच. महाविकास आघाडीचे सरकार आले होते. तेव्हा एक अधिवेशन झाले होते. त्याच अधिवेशनात मी मुख्यमंत्री म्हणून शेतकऱ्यांचे दोन लाखाचे कर्ज माफ केले होते.त्यामुळे शेतकरी तारला होता. करोनाच्या काळात शेतकऱ्यांनी आपली अर्थव्यवस्था तारली होती. थोतांडं नाटके बंद करा. कर्जमुक्ती करा. घोषणा करून भुलभुलैय्या करू नका, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Gautam adani office)
ठाकरे म्हणाले की, धारावीचा विकास करण्याचे काम सुरु झाले आहे. धारावीचा विकास झाला पाहिजे. त्याला आमचा पाठिंबा आहे. परंतु धारावीचा विकास करताना सर्व लोकांचे पुनर्वसन झाले पाहिजे. धारावीच्या जागेत पिढ्यान पिढ्या लोक राहत आहे. यामुळे या ठिकाणी धारावीकरांना ४०० फूट किंवा त्यापेक्षा जास्त जागा दिली गेली पाहिजे. धारावीचा विकास अदानी समूहातर्फे केला जात आहे. अदानी समूहाला त्यासाठी खास सवलती सरकारने दिल्या आहेत. या जागेला सोन्याचा भाव आला आहे.
बॅलेट पेपरवर निवडणूका घ्या
पाच राज्यांच्या निवडणूका झाल्या आता मुंबई महापालिकेची निवडणूक घ्या, असा टोला त्यांनी मोदी सरकराला हाणला. तुमची एवढी लाट आहे तर तर मतदारांची शंका दूर करण्यासाठी एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या. साधी सिनेटची निवडणूक लांबवता तिथे वेळ जात नाही का. मग लोकसभेची मतमोजणी करण्यासाठी वेळ गेला तर बिघडले कुठे. मुंबई महापालिकेची निवडणूकही बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, असे आव्हानही यावेळी त्यांनी दिले.