नवी दिल्ली – काही दिवसात नव्या कंपन्यांची नोंद वाढली असली तरी गेल्या पाच वर्षात एक लाख सहा हजार कंपन्यांनी स्वतः होऊन कामकाज बंद केले आहे. त्यामुळे आता या कंपन्या बंद झाल्या आहेत. ही माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री इंद्रजीत सिंह यांनी लोकसभेत दिली.
ज्या कंपन्या चालविणे शक्य नाही किंवा परवडत नाही, अशा कंपन्यांना आता बंद करण्याची मुभा देण्यात आली आहे. या कंपन्या शक्य तितक्या लवकर बंद करता याव्या आणि याचा प्रवर्तकांच्या भांडवली व्यवस्थेवर परिणाम होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान 2018 ते 2023 या कालावधीत परदेशातील कंपन्यांनी भारतात 7,946 उप कंपन्या स्थापन केल्या आहेत. या माध्यमातून परदेशातील कंपन्या भारतात गुंतवणूक करतात असे त्यांनी सांगितले.