नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधताना 25 मार्च रोजी देशभर लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. केवळ कोरोनाग्रस्त भागातच नवहे तर संपूर्ण देशातच त्यांनी लॉकडाऊन जाहीर केले. या काळात 29 जण कोरोनामुळे मरण पावले. तर आपल्या घराकडे परतताना 21 स्थलांतरितांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
देशात कोरोनामुळे आर्थिक आणि तार्किक पातळीवर नैराश्य पसरले असताना कोरोनाला हाताळणाऱ्या मोदी सरकारला मात्र जनतेचा वाढता पाठिंबा मिळत आहे, असे सी व्होटर च्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.
या सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा 26 आणि 27 मार्चला पार पाडला. तर पहिला टप्पा 17 आणि 18 मार्चला घेण्यात आला होता. या सर्वेक्षणात भारत सरकार कोरोनाचा प्रभावी मुकाबला करत आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला 66.4 टक्के जणांनी “अगदी सहमत’ असे उत्तर दिले. तर 17.1 टक्के जणांनी सहमत असल्याचे सांगितले. तर असहमत असणांची संख्या 4.7 टक्के जण म्हणाले. तर उर्वरीत लोकांनी पूर्णत: असहमत असल्याचे सांगितले.
सी व्होटरने असे सर्वेक्षण 21 देशांत केले. त्यात सर्वाधिक पाठींबा मोदी सरकारला असल्याचे स्पष्ट झाले. पहिल्या टप्प्यात सरकार अगदी योग्य पध्दतीने परिस्थिती हाताळत असल्याचे मान्य करण्यात आले. लॉकडाऊनचे निर्बंध पाळता का? असे विचारता 65.2 टक्के जणांनी पूर्णत: असे सांगितले. 19.7 टक्के जणांनी मोठ्या प्रमाणावर सांभाळतो असे सांगितले. तर काही प्रमाणात 11.3 टक्के जणांनी काही प्रमाणात सांभाळत असल्याचे सांगितले. मात्र 2.6 टक्के जणांनी आपण हे निर्बंध पाळत नसल्याचे सांगितले.
गेल्या काही दिवसांत कोरोनाचे भय वाढले आहे, या पार्श्वभूमीवर हा पाठींबा वाढला असल्याची शक्यता आहे. कारण सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यांत सहभागी झालेल्या 48. 3 टक्के जणांना अथवा त्यांच्या कुटुंबियांना कोरोना झले असल्याची शक्यता वाटत आहे. तर हेच प्रांण 17-18 मार्चला 39.1 टक्के होते. तर आपण किंवा आपल्या कुटुंबियांना कोरोना झालाच नाही असे ठामपणे सांगणाऱ्यांचे प्रमाण 59.7 टक्क्यांवरून दुसऱ्या टप्प्यात 44.3 टक्क्यांवर पोहोचली. हे भय वाढले असल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असतानाही सरकारच्या पाठीशी ठामपणे ऊभे आहेत, असे मानले जात आहे.