नवी दिल्ली – देशावरील कोरोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर मानव संसाधन विकास मंत्री राकेश निशंक यांनी काही प्रमुख परीक्षांचे अर्ज भरण्यासाठी वाढीव मुदत मिळणार असल्याचे संकेत दिले. याबाबतचे माहिती एका नामांकित वृत्तसंस्थेने दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार एचआरडी मंत्री निशंक यांनी अर्ज भरण्यास १ महिन्याचा वाढीव कालावधी देण्यात यावा असा सल्ला प्रवेश परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीला दिल्याचे समजते.
याबाबत बोलताना मानव संसाधन विकास मंत्री राकेश निशंक यांनी, एनटीएच्या महासंचालकांना आयसीएआर परीक्षा, जेएनयू प्रवेश परीक्षा, यूजीसी नेट, सीएसआयआर नेट व अन्य प्रवेश परीक्षांचे अर्ज भरण्यास महिन्याची वाढीव मुदत देण्यात यावी असा सल्ला दिल्याचे सांगितले आहे.