काऱ्हाटी – यंदा हवामान बदलाचा परिणाम गहू, हरभरा, ज्वारी, मका व कांदा आदीरब्बी पिकांवर मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या पिकांवर मोठ्या प्रमाणात रोग पडत असून, या पिकांची पाहणी व रोगांचे निदान करण्यासाठी कृषी विभाग व कृषी शास्त्रज्ञ यांच्या पथकाने भेट देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
धुक्यामुळे कांदा, गहू, ज्वारी, मका, हरभरा या पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. वातावरणात अचानकपणे झालेला बदल व आद्रता यामुळे करपा, इतर बुरशी; तसेच जिवाणू यांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे वाढ झालेल्या बुरशीचा प्रार्दुभाव पिकांवर झाला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.