नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचारावरील चर्चेदरम्यान विरोधकांनी केलेल्या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर दिले आहे.
दिल्लीत हिंसाचार घडवून आणण्याचे मोठे षडयंत्र होते असा गाम्भीर आरोप त्यांनी केला आहे. हिंसाचार चौकशीसाठी एसआयटीच्या दोन टीम बनवण्यात आल्या आहेत, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
पुढे बोलताना शहा म्हणाले की, दिल्ली हिंसाचाराला एका विशिष्ट धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. हिंसाचार घडवून आणण्यासाठी उत्तर परदेशातून 300 पेक्षा जास्त लोक आले होते.
दिल्ली हिंसाचार सवार्त मोठं षडयंत्र होत. हिंसाचारात ज्यांचा सहभाग आहे अशाना सोडणार नसल्याचे गृहमंत्री म्हणाले.
Home Minister Amit Shah: We did not take the riots casually. Prima facie, I believe that the riots were pre-planned. I assured families of the riot victims that the culprits will not be spared no matter which religion, caste or political party they belong to. #Delhiviolence pic.twitter.com/fPykEqpF9n
— ANI (@ANI) March 11, 2020
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिल्लीमध्ये अजूनही ‘खून की होली’ सुरू असल्याचा आरोप केल्यानंतर शहा म्हणाले की, 25 फेब्रुवारीला रात्री 11 नंतर हिंसाचाराची कोणतीही घटना घडलेली नाही.
दिल्लीत दंगल झालेल्या भागाची लोकसंख्या 20 लाखांच्या आसपास होती. 12 पोलीस स्टेशन परिसरात हिंसा पसरली होती. 4 टक्के भागामध्येच हिंसेला रोखण्यात आलं असं त्यांनी सांगितले.
दरम्यान आतापर्यंत 700 पेक्षा जास्त लोकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 2647 लोकांना अटक झाली असून गुन्हेगारांना अटक करण्यासाठी पोलिसांचे 40 पथक तैनात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
दिल्ली हिंसाचारावेळी अमित शाह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमात होते, असा विरोधकांनी आरोप केल्यानंतर शाह म्हणाले, मी सांगितल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हिंसाचारग्रस्त भागात गेले.
मी ट्रम्प यांच्या दौऱ्यादरम्यान दिल्ली पोलिसांसोबत बैठका घेत होतो. मी ट्रम्प यांच्यासोबतआग्रा येथे गेलो नाही, ट्रम्प यांच्या सोबत जेवणसुद्धा घेतले नाही असे उत्तर त्यांनी दिले.विरोधकांनी केलेले आरोप निराधार असल्याचेही गृहमंत्री म्हणाले.