धारवाड (कर्नाटक) – अमित शहा हे स्वतंत्र भारतातील सर्वात अकार्यक्षम गृहमंत्री आहेत अशी टीका कर्नाटकचे मंत्री आणि काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनी केली आहे. मणिपुर मधील सतत अनेक महिने सुरू असलेला हिंसाचार आणि संसदेवरील हल्ला हा त्यांच्या अकार्यक्षमतेचाच पुरावा असून या दोन्ही प्रकरणात त्यांना काहीही करता आलेले नाही असे त्यांनी म्हटले आहे.
प्रियांक खर्गे हे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे चिरंजीव आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीबाबत अमित शहा यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानावर त्यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की अमित शहा यांच्याकडे सीएए कायदा या विषयावर बोलण्या वेळ आहे. आपल्या मुलासमवेत अहमदाबाद मध्ये क्रिकेट सामना पहाण्यास वेळ आहे पण मणिपुर हिंसाचार किंवा संसद हल्ला या विषयावर भाष्य करण्यास त्यांच्याकडे वेळ नाही.
या विषयावर लोकांचे लक्ष अन्यत्र विचलीत करण्याऐवजी अमित शहा यांनी या दोन्ही प्रकरणातील तपासाकडे लक्ष द्यावे अशी सुचनाही खर्गे यांनी केली. ते आज एएन आय वत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. नागरीकत्व दुरूस्ती कायदा कोणीही रोेखू शकत नाही असे विधान अमित शहा यांनी केले होते त्यावर प्रियांक यांना प्रतिक्रीया विचारली असता त्यांनी वरील विधान केले.