नवी दिल्ली – नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनेने प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान मोठा हिंसाचार घडला. यामध्ये ३०० पेक्षा अधिक पोलीस जखमी झाले. याशिवाय सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी २० शेतकरी नेत्यांना नोटीस पाठवली असून उत्तर देण्यासाठी तीन दिवासांचा कालावधी दिला आहे.
Delhi Police issues notice to Bharatiya Kisan Union spokesperson Rakesh Tikait asking to explain as to why legal action should not be taken against him for breaching the agreement with police regarding the tractor rally on January 26. (File photo) pic.twitter.com/KKZqx2Igt5
— ANI (@ANI) January 28, 2021
शेतकरी संघटनांच्या ट्रॅक्टर संचलनाला परवानगी देताना काही अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांचे पालन करण्याचे टाळून शेतकरी संघटनांनी विश्वासघात केला. काही शेतकरी नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे केली. त्यानंतर गोंधळाला सुरूवात झाली.
हिंसाचारात सामील असणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही आणि व्हिडीओ फुटेजचा आधार घेतला जात आहे. हिंसाचारावेळी दिल्ली पोलिसांनी संयम बाळगला. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईत कुणाचाही मृत्यू झाला नाही, अशी भूमिका दिल्लीचे पोलीस प्रमुख एस.एन.श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत मांडली होती.
दरम्यान, जवळपास दोन महिन्यांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आता फूट पडल्याचे समोर आले आहे. भारतीय किसान युनियन आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघाने आपलं आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही संघटनांचे नेते व्ही. एम. सिंग आणि ठाकूर भानूप्रताप सिंह यांनी बुधवारी याची घोषणा केली आहे.