सुरक्षा यंत्रणांकडून नऊ ठिकाणी हाय अलर्ट जारी
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीवरील दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. याविषयीची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आली आहे. त्यानुसार दिल्लीतील नऊ ठिकाणांवर रेड अलर्ट जारी करण्यात आला. देशातील सणासुदीचा फायदा घेत दहशतवादी राजधानी हादरवण्याचा प्लान करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे चार ते पाच दहशतवादी दिल्लीत घुसले असल्याचे सांगण्यात येत आहे. या दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यात आले त्याचा बदला घ्यायचा असल्याचे सांगितले जात आहे. राजधानीत किमान दोन पाकिस्तानी दहशतवादी आहेत. रात्री नऊ वाजता दिल्ली पोलिसांच्या विशेष सेल आणि गुप्तचर यंत्रणांनी शहरातील नऊ ठिकाणी छापा टाकला. यावेळी दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
मध्य दिल्लीतील सीलमपूर आणि उत्तर पूर्व दिल्ली, जामिया नगर आणि पहाड़गंज या दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले. कलम 370 रद्द केल्यापासूप जैश सूड घेण्याची धमकी देत आहे. त्याचबरोबर सुरक्षा यंत्रणा या धमक्यांचा विचार करून काही काळ सातत्याने अलर्ट जारी करत आहेत. फॉरेन इंटेलिजेंस एजन्सीनुसार, जैश 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान भारतात दहशतवादी हल्ल्याची योजना आखत होता. त्यानंतर जम्मू, अमृतसर, पठाणकोट, जयपूर, गांधीनगर, कानपूर तसेच लखनऊसह एकूण 30 शहरांना हाय अलर्ट ठेवण्यात आले.