नवी दिल्ली : येत्या ८ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुका पार पडणार असल्याने राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजधानी दिल्ली काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असली तरी प्रत्यक्ष प्रचारात मात्र सत्ताधारी आम आदमी पक्ष व प्रमुख विरोधक भारतीय जनता पक्षाने बाजी मारल्याचं चित्र आहे. अशातच भाजप नेते परवेश वर्मा यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा उल्लेख ‘दहशतवादी’ असा केला होता. वर्मा यांना आज त्यांच्या या वक्तव्याबाबत प्रश्न केला असता त्यांनी आपण केलेलं विधान योग्यच असल्याचा दावा केला.
एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं असून ‘मी संपूर्ण विचार करूनच केजरीवालांचा उल्लेख ‘दहशतवादी’ असा केला होता व मला यामध्ये काहीही गैर वाटत नाही.’ असं वक्तव्य प्रवेश वर्मा यांनी केलं आहे. यावेळी बोलताना वर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका-टिपणी करणाऱ्या केजरीवालांना कितीही दूषणे दिली तरी ती कमीचं पडतील असं मत व्यक्त केलं.
BJP’s Parvesh Verma on his remark where he called Chief Minister Arvind Kejriwal a ‘terrorist’: I spoke after giving a proper thought to it and I don’t think I made any mistake. If Delhi’s CM speaks ill of Prime Minister, whatever is spoken about the CM is less. #DelhiElections pic.twitter.com/2VZSx6NVnl
— ANI (@ANI) February 3, 2020