मुंबई – करोनामुळे नागरिकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. सोन्याचे दर वेगाने वाढले आहेत. त्यामुळे एप्रिल ते जून या तीन महिन्यांत भारतातून सोन्याच्या मागणीत 70 टक्के घट झाली आहे.
या काळात भारतात फक्त 67 टन सोन्याची आयात झाली असे जागतिक सुवर्ण परिषदेने म्हटले आहे.
गेल्या वर्षी या काळात भारताने 213 टन सोने आयात केले होते. सोने महाग असल्यामुळे दागिन्यासाठी सोन्याची खरेदी होत नाही तर गुंतवणुकीसाठी होते असेच समजले जात होते. मात्र भारतामध्ये या तीन महिन्यात गुंतवणुकीसाठी खरेदी केलेल्या सोने 56 टक्क्यांनी कमी झाली आहे.
या काळात गुंतवणुकीसाठी 20 टन सोने खरेदी केले गेले. गेल्यावर्षी गुंतवणुकीसाठी 44.5 सोने खरेदी केले होते. याचा अर्थ गुंतवणुकीसाठी जागतिक पातळीवर सोन्याची खरेदी वाढली असताना भारतात मात्र ती वाढलेली नाही. या काळात भारतीयांनी दागिन्याबरोबरच गुंतवणूक म्हणूनही सोन्याची फारशी खरेदी केली नसल्याचे दिसून येते, असे जागतिक सुवर्ण परिषदेचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम पी.आर यांनी सांगितले. आगामी काळाबाबत त्यानी आशावाद व्यक्त केला.