लातूर – लग्नाच्या तयारीत असलेल्या कुटुंबातील एकुलत्या एक मुलाचे अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ लातूर जिल्ह्यातील एका कुटंबावर आली आहे. गेल्या सोमवारपासून बेपत्ता असलेल्या तरूणाचा मृतदेह काल पाझर तलावात सापडला. गणेश दापके (हरगुळी, जिल्हा लातूर) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. 6 फेब्रुवारी रोजी गणेशचे लग्न होते दुर्दैवीने याआधीच त्याचा मृत्यू झाला.
मागील सोमवारी सकाळी शेतात जातो म्हणून गणेश घरातून बाहेर पडला. परंतु, तो शेतातून घरी परत आलाच नाही. गणेशचा मोबाइल शेताजवळील पाझर तलावाच्या बाजूला आढळून आला. नाईतवाईकांनी तत्काळ वाढवना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या सर्व घडामोडीनंतर सात दिवसांनी त्याचा मृतदेह पाझर तलावात आढळून आला आहे. गणेशचा शेताच्या शेजारील व्यक्तीसोबत वाद होता. यातूनच त्याचा खून करण्यात आल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
31 जानेवारीला आमच्याकडे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आम्ही तपास करत होतो. परंतु, आज गणेशचा मृतदेह सापडला असून पुढील तपास चालू आहे, अशी माहिती वाढवना पोलीस ठाण्याचे अधिकारी नौशाद पठान यांनी दिली आहे.