मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील समस्या न सुटल्यास आंदोलन करणार असं विधान केलं होत. यावर भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्विट करत टीका केली होती त्यांनी ट्विट केले होते की,’बारामती लोकसभा – खासदार सुप्रिया सुळे .. ६ पैकी २ आमदार – NCP ..अजित पवार अनेक वेळा पालकमंत्री ..पवार साहेब स्वतः बारामतीचे किंम जॉन्ग .. स्थानिक सर्व बॉडी – NCP .. एवढं असून जर आंदोलन करावं लागतं तर बारामती चे खासदारच बदलावे लागतील.’ असे म्हणत त्यांनी टीका केली होती. यावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
सुषमा अंधारे यांनी ट्विट केले आहे,’प्रिय निलू बाळा, तू अत्यंत कळकळीने लिहिलेस म्हणून, हिंदुत्ववादी आहोत म्हणत केंद्रात bjp अन् राज्यात EDसरकार आले. तरीही जर सेनाभवन समोर हिंदुत्वासाठी आक्रोशमोर्चा काढावा लागत असेल तर याचा अर्थ विद्यमान सरकार हे हिंदुत्वविरोधी आहे तेव्हा ते बदलावीच लागेल नाही का?’ असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.