नगर -शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खाजगी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदा जिल्ह्यातील 400 शाळांनी नोंदणी केली आहे. या शाळांतील एकूण प्रवेशा क्षमतेच्या 25 टक्के म्हणजेच 3013 जागांवर मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 2924 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएस पाठवले आहेत. प्रवेशासाठी 20 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या काळात विद्यार्थ्यांच्या पालकांनी पडताळणी समितीमार्फत कागदपत्रांची पडताळणी करुन विद्यार्थ्यांचा शाळेतील प्रवेश निश्चित करायचा आहे. या काळात शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
यंदा पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 2924 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अकोले 114, जामखेड 54, कर्जत 98, कोपरगाव 233, नगर मनपा 284, नगर 286, नेवासा 210, पारनेर 141, पाथर्डी 129, राहाता 381, राहुरी 261, संगमनेर 280, शेवगाव 183, श्रीगोंदा 83 आणि श्रीरामपूर तालुक्यात 187 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.