लखनौ – उत्तरप्रदेशातील भाजपच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलेले तिसरे मंत्री दारासिंह चौहान यांनीही आज समाजवादी पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना दारासिंह यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली.
ते म्हणाले की सन 2017 ची निवडणूक लढवताना भाजपने सबका साथ सबका विकास अशी घोषणा दिली होती. त्यावेळी त्यांना सर्वांचीच मदत मिळाली पण त्यांच्या राजवटीत काही मोजक्या लोकांचाच विकास झाला असा आरोप त्यांनी केला.
यावेळी दलित आणि ओबीसी एकत्र येतील आणि ते उत्तरप्रदेशच्या राजकारणाची दिशा बदलतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्ही एकत्र येऊन अखिलेश यादव यांनाच यंदा युपीचे मुख्यमंत्री बनवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.